અડધી મરાઠી અને અડધી ગુજરાતી એવી મિત્ર અલ્કા અસેરકર-ગાંધીએ એક વાર્તા લખી. પછી એ મુંજાઈ. અને એણે ફોરમમાં માર્ગદર્શન માટે ટહેલ નાખી ત્યારે..
~~ आई ~~
अनिताला नुकतंच बाळ झालं होतं. आईने बाळाला आणि अनिताला मालिश करण्यासाठी बोलावून घेतलेली जिजाक्का म्हणजे पक्की बोलघेवडी. गावात कितीतरी जणींची बाळंतपणं आणि तेलमालिशची कामं तिच्याकडे होती. त्या सर्वांच्या बातम्या इकडून तिकडे पोचवण्याची तिची दांडगी हौस. परंतु तिच्या त्या गॉसिपिंग करण्यातही निर्मळपणा असे. विखारी गॉसिपिंग नसे.
अनिता त्याच गावात लहानाची मोठी झाली. परंतु कोणाच्या अध्यात ना मध्यात अशी तिची स्वकेंद्री वृत्ती. पण बाळंतपणाच्या या निवांत काळात जिजाक्काकडून गावातल्या एकेक गोष्टी जाणून घेण्याची खूप उत्सुकता वाटत असे हे खरं.
विशेषतः जिजाक्का सैपाकाचं काम करत असलेल्या एका घराबद्दल जाणून घेण्यासाठी ती नेहमीच उत्सुक असे. आणि ते घर होतं दोन लहान मुलांचं. त्यातला एक दहावीत तर दुसरा सहावीत.
“अय्यो दोन मुलंच राहतात एकटी?...आणि त्यांचे आईबाप”...?
“आईने दुसरं लग्न केलंय..”
अनिताच्या डोळ्यात आश्चर्य
“पण मग ती मुलांना नाही घेऊन गेली”?...मग जिजाक्काने सर्व सविस्तर सांगितलं..
त्या मुलांची आई लांबची कुठली तरी घाटावरची. नव-याशी पटत नाही, की नव-याने सोडून दिली म्हणून या गावात दोन मुलांना घेऊन आली. नोकरी धंदा शोधत होती. कुठली कोण हे जिजाक्काला काहीच ठाऊक नव्हतं. तिचं सासर माहेर कुठलं काही माहीत नाही. बाई तर भल्या घरची थोडीफार शिकलेलीही होती. पण भलभल्यांना नोक-या मिळत नाहीत तिथं या बाईला कोण देणार. हे गाव तालुक्याचं. बारा भानगडी राजकारणी लोकांचं. बाहेरून आलेल्या आणि एकट्या राहणा-या तरुण बाईवर सतरा लोकांचा डोळा. त्यातच एका स्थानिक राजकारणातल्या माणसाशी ओळख झाली. तो आधीच विवाहीत. मुलंबाळं असलेला. पण हिच्याशी दुसरं लग्न करायला तयार झाला. दुस-या लग्नाकरिता त्याला कायदा आड येण्याचा काही प्रश्नच नव्हता. पहिल्या बायकोची काय बिशाद होती तक्रार वगैरे नोंदवण्याची !
पण त्याच्या आईने अट घातली. ‘तू कर तिच्याशी लग्न करायचं तर. पण ती मुलं इथं येता कामा नयेत दुस-याची’. बाईची पंचाईत झाली. परंतु उपाशी मरण्याची वेळ येत होती. राहायचं कसं कुठं?, मुलांचं काय करायचं ? त्यांच्या शिक्षणाचं काय ?
परंतु त्या माणसाने तिला सांगितलं, की तू मुलांना वेगळी खोली घेऊन ठेव. त्यांचं सारं शिक्षण मी करेन. फक्त माझ्या आईमुळे मला त्यांना आपल्या घरी नेता येणार नाहीत. बाई तयार झाली.
अनिता त्याच गावात लहानाची मोठी झाली. परंतु कोणाच्या अध्यात ना मध्यात अशी तिची स्वकेंद्री वृत्ती. पण बाळंतपणाच्या या निवांत काळात जिजाक्काकडून गावातल्या एकेक गोष्टी जाणून घेण्याची खूप उत्सुकता वाटत असे हे खरं.
विशेषतः जिजाक्का सैपाकाचं काम करत असलेल्या एका घराबद्दल जाणून घेण्यासाठी ती नेहमीच उत्सुक असे. आणि ते घर होतं दोन लहान मुलांचं. त्यातला एक दहावीत तर दुसरा सहावीत.
“अय्यो दोन मुलंच राहतात एकटी?...आणि त्यांचे आईबाप”...?
“आईने दुसरं लग्न केलंय..”
अनिताच्या डोळ्यात आश्चर्य
“पण मग ती मुलांना नाही घेऊन गेली”?...मग जिजाक्काने सर्व सविस्तर सांगितलं..
त्या मुलांची आई लांबची कुठली तरी घाटावरची. नव-याशी पटत नाही, की नव-याने सोडून दिली म्हणून या गावात दोन मुलांना घेऊन आली. नोकरी धंदा शोधत होती. कुठली कोण हे जिजाक्काला काहीच ठाऊक नव्हतं. तिचं सासर माहेर कुठलं काही माहीत नाही. बाई तर भल्या घरची थोडीफार शिकलेलीही होती. पण भलभल्यांना नोक-या मिळत नाहीत तिथं या बाईला कोण देणार. हे गाव तालुक्याचं. बारा भानगडी राजकारणी लोकांचं. बाहेरून आलेल्या आणि एकट्या राहणा-या तरुण बाईवर सतरा लोकांचा डोळा. त्यातच एका स्थानिक राजकारणातल्या माणसाशी ओळख झाली. तो आधीच विवाहीत. मुलंबाळं असलेला. पण हिच्याशी दुसरं लग्न करायला तयार झाला. दुस-या लग्नाकरिता त्याला कायदा आड येण्याचा काही प्रश्नच नव्हता. पहिल्या बायकोची काय बिशाद होती तक्रार वगैरे नोंदवण्याची !
पण त्याच्या आईने अट घातली. ‘तू कर तिच्याशी लग्न करायचं तर. पण ती मुलं इथं येता कामा नयेत दुस-याची’. बाईची पंचाईत झाली. परंतु उपाशी मरण्याची वेळ येत होती. राहायचं कसं कुठं?, मुलांचं काय करायचं ? त्यांच्या शिक्षणाचं काय ?
परंतु त्या माणसाने तिला सांगितलं, की तू मुलांना वेगळी खोली घेऊन ठेव. त्यांचं सारं शिक्षण मी करेन. फक्त माझ्या आईमुळे मला त्यांना आपल्या घरी नेता येणार नाहीत. बाई तयार झाली.
जिजाक्का त्याच मुलांच्या सैपाकाचं काम करत होती. परंतु ती जे सांगायची त्याने त्या मुलांबद्दल खूप सहानुभूती वाटायची. मुलं राहात असलेली खोली फारशी चांगली नव्हती. शेताडीतली खोली. आजुबाजूला भातशेती, चिखल, घराला ओल. जिजाक्का एकदाच सैपाक करून येई. तोच ती मुलं दोन्ही वेळेला खात असत. शाळेत जात असतं. धाकटा मुलगा सहावीतला म्हणजे खूपच लहान. तो अगदीच बिच्चारा वागत असे. मोठा त्याला सांभाळून घेत असे. असे दोघे दोघेच राहत होते.
“मग त्यांची आई येत नाही का त्यांना भेटायला”?...अनिताचा प्रश्न...
“येत असेल...येते तर काय” जिजाक्काचं तोंड मुरडून उत्तर. “पण ती राहू शकत नाही. थोडा वेळासाठी येते नि जाते. तिला काय पडलेय त्या मुलांची....”
अनिताला काहीच कळत नसे....’कोण असेल ती बाई.....कुठून आली असेल’? एवढी दोन मुलं एकटी सोडून दुसरं लग्न करण्याची तिला एवढी निकड का वाटली असेल ?..काय मजबूरी असेल तिची ?..त्या मुलांबद्दल मात्र कणव दाटून येई.
जिजाक्का मालिशला फक्त दोन महिनेच होती. त्यानंतर बंद झाली. मात्र काही महिन्यांनी सहज म्हणून भेटायला आली पुन्हा. ती आल्यावर अनिताला आधी आठवली ती मुलं...तिने आधी त्या मुलांबद्दल विचारलं.
जिजाक्का मालिशला फक्त दोन महिनेच होती. त्यानंतर बंद झाली. मात्र काही महिन्यांनी सहज म्हणून भेटायला आली पुन्हा. ती आल्यावर अनिताला आधी आठवली ती मुलं...तिने आधी त्या मुलांबद्दल विचारलं.
जिजाक्का म्हणाली, “काय सांगू बाई. तो धाकटा मुलगा तर मेला”.
“ऑं ?....मेला ?....आई गं !...कसा काय....?”
“ऑं ?....मेला ?....आई गं !...कसा काय....?”
“साप चावून...शेतातली जागा. जीव जनावरं निघायचीच तिथं.”
अनिताच्या हृदयातून कळ उठली. “आणि तो मोठा गं मग”?..
“तो दहावीत बोर्डात आला. वरच्या नंबरला”.
काय तरी नियती बाई..असा अनाथ मुलगा ....बोर्डात पहिला काय येतो...धाकटा साप चावून काय मरतो...अयाई गं...
“मग ....पुढे काय आता...”
“त्या मुलाचा शाळेत सत्कार झाला”...जिजाक्का म्हणाली. त्यामुळे त्याची हुशारी त्याच्या आईच्या दुस-या नव-याला पण जाणवली. त्याने त्याच्या पुढच्या सगळ्या शिक्षणाचा खर्च करायचं ठरवलंय. त्याला जे जितकं शिकायचं असेल त्यासाठी. आणि त्याला आता पुढ्च्या शिक्षणासाठी बाहेरगावी होस्टेलला ठेवलाय त्याने”.....
अनिताच्या हृदयातून कळ उठली. “आणि तो मोठा गं मग”?..
“तो दहावीत बोर्डात आला. वरच्या नंबरला”.
काय तरी नियती बाई..असा अनाथ मुलगा ....बोर्डात पहिला काय येतो...धाकटा साप चावून काय मरतो...अयाई गं...
“मग ....पुढे काय आता...”
“त्या मुलाचा शाळेत सत्कार झाला”...जिजाक्का म्हणाली. त्यामुळे त्याची हुशारी त्याच्या आईच्या दुस-या नव-याला पण जाणवली. त्याने त्याच्या पुढच्या सगळ्या शिक्षणाचा खर्च करायचं ठरवलंय. त्याला जे जितकं शिकायचं असेल त्यासाठी. आणि त्याला आता पुढ्च्या शिक्षणासाठी बाहेरगावी होस्टेलला ठेवलाय त्याने”.....
कहाणी तिथंच संपली. पुढे काहीच कळलं नाही अनिताला त्याबद्दल. न पाहिलेली मुलं आणि त्यांची आई....परंतु मनाच्या एका कोप-यात सतत वाटत राहिलं ...त्या मुलांना भेटायला हवं होतं..त्याच्या आईलाही...पण त्याच्या आईला तर भेटणं शक्यच नव्हतं. शिवाय अनिताही आज आहे तशी तेव्हा मुखत्यार, स्वतंत्र नव्हती. काही पाश होते. काही लहान गावातलं वातावरण आड येत होतं. आजच्या इतकी सामाजिक जाण नव्हती न भान नव्हतं.
कुठे असेल तो मोठा मुलगा....काय करत असेल....!
No comments :
Post a Comment